मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १९१ ते १९५

पंचीकरण - अभंग १९१ ते १९५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१९१॥
धाकुटाचि धुरू तो नव्हे लेंकरूं ।
जया सर्वेश्र्वरू प्रगटला ॥१॥
प्रगटला देव तया उपमन्या ।
भावार्थ अनन्या क्षीरसिंधू ॥२॥
क्षीरसिंधुवासी स्वयें नारायण ।
प्रर्‍हादरक्षण करितसे ॥३॥
करितो रक्षण दासासी संकटीं ।
त्याचें नाम कंठीं असों द्यावें ॥४॥
असो द्यावें सदा देवाचें चिंतन ।
गजेंद्र पावन नामघोषें ॥५॥
॥१९२॥
आलिया देवासी वाट चुकलासी ।
म्हणोनि आळसी संवसारीं ॥१॥
संसा-राचें दु:ख करिसी रुदन ।
चुकलें भजन राघवाचें ॥२॥
राघवाची भक्ति नेणव्युतां व्युत्पत्ति ।
तुज अधोगति जन्म झाला ॥३॥
जन्म झाला परी वेगें सोय धरी ।
सत्वर संसारीं मोक-ळिक ॥४॥
मोकळिक होय भक्तिपंथें जातां ।
वाक्य हें तत्त्वतां दास म्हणे ॥५॥
॥१९३॥
विषयरुदन सोडूनियां द्यावें ।
नित्य नित्य जावें संतसंगें ॥१॥
संतसंगें बापा होंई रे निश्चळ ।
मग तळमळ विसरसी ॥२॥
विसरसी दु:ख संताचे संगतीं ।
चुके अधोगति गर्भवास ॥३॥
गर्भवास आतां चुकवी आपले ।
धरावीं पाउलें राघवाचीं ॥४॥
राघवाचे भक्त राघवीं मिळती ।
भेटे सीतापति दास म्हणे ॥५॥
॥१९४॥
माता पिता जन स्वजन कांचन ।
मिया पुत्रीं मन गोवूं नये ॥१॥
गोवूं नको मन राघवावांचूनी ।
लोकलाज जनीं लागलीसे ॥२॥
लागलीसे परि तुवाम न धरावी ।
स्वहितें करावी रामभक्ति ॥३॥
रामभक्तींवीण होशील हिंपुटी ।
येकलें शेवटीं जाणें लागे ॥४॥
जाणें लागे आतां बाळा सुलक्षण ।
व्यांई रामराणा दास म्हणे ॥५॥
॥१९५॥
माझे मनीं सर्व सुख व्हावें तुज ।
म्हणोनियां गुज सांगतसें ॥१॥
सांग-तसें हित तें जीवीं धरावें ।
भजन करावें राघोबाचें ॥२॥
राघोबाचें प्रेम तें करी विश्राम ।
येर सर्व श्रम जाण बापा ॥३॥
जाण बापा वचन हें माझें प्रमाण ।
वाहतसें आण राघवाची ॥४॥
राघवाची भक्ति ते माझी विश्रांति ।
असों द्यावी चित्तीं दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP