मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १६१ ते १६५

पंचीकरण - अभंग १६१ ते १६५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१६१॥
मृत्तिकेचा ऐसा करी नानापरी ।
मागुता टवकारी नर्क तेथें ॥१॥
नर्क तेथें आहे कैसा हा काढावा ।
व्यर्थ वाढवावा लोकाचार ॥२॥
लोकाचार केला लैकिकीं देखतां ।
अंतरी शुद्धता आढळेना ॥३॥
आढळेना ज्ञान पूर्ण समाधान ।
सर्वदा बंधन संदेहाचें ॥४॥
संदेहाचे पाप झालें वज्रलेप ।
विचार निष्पापर रामदासीं ॥५॥
॥१६२॥
प्रपंचीं तें भाग्य परमार्थीं वैराग्य ।
दोनी यथासांग दोहींकडे ॥१॥
दोहींकडे सांग होतां तो समर्थ ।
नाहींतरी व्यर्थ तारंबळीं ॥२॥
तारंबळी होतां विचार नसतां ।
दास म्हणे आतां सावधान ॥३॥
॥१६३॥
बंधाचा मुमुक्षें प्रबोध करावा ।
मग उद्धरावा ज्ञानमार्गें ॥१॥
ज्ञानमार्गें द्यावें सत्य समाधान ।
तरी मग जन पाठीं लागे ॥२॥
पाठीं लागे त्याचें अंतर जाणावें ।
आपुलें म्हणावें दास म्हणे ॥३॥
॥१६४॥
पतित हे जन करावे पावन ।
तेथें अनुमान करूं नये ॥१॥
करूं नये गुणदोष उठाठेवी ।
विवेकें लावावी बुद्धि जना ॥२॥
बुद्धि सांगे जना त्या नांव सज्जन ।
पतितपावन दास म्हणे ॥३॥
॥१६५॥
महापापी लोक पूर्वींचे आहेती ।
तेचि पालटती जयाचेनी ॥१॥
जयाचेनि योगें होतसे उपाय ।
तुटती अपायें नानाविध ॥२॥
नानाविध जन सुबुद्धचि होती ।
साधूचे संगतीं दास म्हणे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP