मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|पंचीकरण|
अभंग १ ते ५

पंचीकरण - अभंग १ ते ५

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
ओवीचे आरंभी वंदूं विनायक ।
बुद्धिदाता एक लोकांमध्यें ॥१॥
लोकांमध्यें बुद्धिविण कामा नये ।
बुद्धीचा उपाये सर्वत्रांसी ॥२॥
सर्वत्रांसी बुद्धि देतो गणनाथ ।
करितो सनाथ अनाथासी ॥३॥
अनाथा नाथाचा नाथ केला जनीं ।
तो हा धरा ध्यानीं लंबोदर ॥४॥
लंबोदर विद्यावैभवापरता ।
दास म्हणे माता सरस्वति ॥५॥
॥२॥
नमूं योगेश्वरी शारदा सुंदरी ।
श्रोता प्रश्र करी वक्तयासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण ।
शिवाचें लक्षण सांगा मज ॥२॥
सांगा मज आत्मा कैंचा परमात्मा ।
बोलिजे अनात्मा तो कवण ॥३॥
कवण प्रपंच कोणें केला संच ।
मागुता विसंच कोण करी ॥४॥
कोण तें अविद्या सांगे जो जी विद्या ।
कैसें आहे आद्य स्वरूप तें ॥५॥
स्वरूप ते माया कैसी मूळमाया ।
ईसीं चाळावया कोण आहे ॥६॥
आहे कैसें शून्य कोणतें चैतन्य ।
समाधान्य अन्य तें कवण ॥७॥
कोण तो जन्मला कोणा मृत्यु आला ।
भ्रममुक्त झाला तो कवण ॥८॥
कवण जाणता कवणाची सत्ता ।
मोक्ष हा तत्त्वतां कोण सांगा ॥९॥
सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण ।
पंचवीस प्रश्र दासें केले ॥१०॥
॥३॥  
नमूं वेदमाता नमूं त्या अनंता ।
प्रश्र सांगों आतां श्रोतयाचे ॥१॥
श्रोतयाचे प्रश्र जीव हा अज्ञान ।
जया सर्व ज्ञान तोची शिव ॥२॥
शिवपर आत्मा त्यापर परमात्मा ।
बोलिजे अनात्मा अनिर्वाच्य ॥३॥
वाच्य हा प्रपंच माईक जाणावा ।
घडामोडी देवा-पासूनियां ॥४॥
विषय अविद्या त्यागावी ते विद्या ।
निर्विकल्प आद्या तेंचि रूप ॥५॥
कल्पना हे माया सत्त्वमूळमाया ।
ईसी चाळावया चैतन्यची ॥६॥
नकार तें शून्य व्यापक चैतन्य ।
ईश्वर अनन्य समाधान ॥७॥
जीव हा जन्मला जीवा नृत्यु झाला ।
बद्ध मुक्त झाला तोही जीव ॥८॥
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता ।
मोक्ष हा तत्त्वतां ईश्वरची ॥९॥
ईश्वर निर्गुण ईश्वर सगुण ।
हेची ब्रह्मखूण दास म्हणे ॥१०॥
॥४॥
सत्य राम एक सर्वही माईक ।
जाणा हा विवेक योगियांचा ॥१॥
योगियांचा देव तया नाहीं खेव ।
जेथें जीव शिव ऐक्यरूप ॥२॥
ऐक्यरूप जेथें तें पीठ ब्रह्मांड ।
ब्राह्म तें अखंढ निराकार ॥३॥
निराकार ब्रह्म बोलताती श्रती ।
आदि मध्य अंतीं सारिखेंची ॥४॥
सारिखेचि ब्रह्म नभाचियेपरी ।
बाह्य अभ्यंतरीं कोंदाटलें ॥५॥
कोंदाटलें परी पाहतां दिसेना ।
साधूवीण येना अनुभवा ॥६॥
अनुभवा येतां तेम ब्रह्म निश्वळ ।
जाय तळमळ संसाराची ॥७
संसाराचें दु:ख सर्वही विसरे ।
जरी मनों भरे स्वस्वरूप ॥८॥
स्वस्वरूपीं नाहीं सुख आणि दु:ख ।
धन्य हा विवेक जयापासीं ।\९॥
जयापासीं ज्ञान पूर्ण समाधान ।
त्याची आठवण दास करी ॥१०॥
॥५॥
मन हें विवेकें विशाळ करावें ।
मग आठवावें परब्रह्म ॥१॥
परब्रह्म मनीं तरीच निवळे ।
जरी बोधें गळे अहंकार ॥२॥
अहंकार गळे संताचे संगतीं ।
मग आदि अंतीं समाधान ॥३॥
समाधान घडे स्वस्वरूपीं राहतां ।
विवेक पहातां नि:संगाचा ॥४॥
संग नि:संगाचा दृढ तो धरावा ।
संसार तरावा दास म्हणे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP