पंचक - संवादपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
तुज कैसें पाहुं देवा ।
तुझी कैसी करूं सेवा ॥१॥
बहू देव पाहुनि आलों ।
बहूरूपीं भांबावलों ॥२॥
किती देवळें मोडती ।
किती देव भंगोनि जाती ॥३॥
बहुतांच्या बोले गेलों ।
तेणें बहुत कष्ठलों ॥४॥
रामीं रामदास म्हणे ।
ऐशीं जनांचीं लक्षणें ॥५॥
॥२॥
देव म्हणे मी जात नाहीं ।
आतां चिंता न करी कांहीं ॥१॥
मन पहावा संतां-पाशीं ।
सेवीं जाण त्या भक्तांसी ॥२॥
मज जाणावें विचारें ।
सगुणाचे भजनद्वारें ॥३॥
देव म्हणतो दासासी ।
रे मी आहें तुजपासीं ॥४॥
॥३॥
माझीं ब्रीदें कां विसरतां ।
आणि व्यर्थ कां चेष्टतां ॥१॥
भक्तवत्सल दीना-नाथ ।
तुम्हां आधार समर्थ ॥२॥
भय दाखवी अनिवारी ।
तोचि सर्व चिंता करी ॥३॥
दासासमीप राहतो ।
योगक्षेमही वाहतों ॥४॥
॥४॥
मज गांजिलें तें साहे ।
परि भक्तांचें न साहे ॥१॥
माझा भक्ता शीण व्हावा ।
मग मजसीं त्यांसी दावा ॥२॥
मज अवतार घेणें ।
माझ्या भक्तांचे कारणें ॥३॥
निज दासांसी पाळावें ।
दुर्जनासी निर्दाळावें ॥४॥
॥५॥
आतां बोलावें तें किती ।
मनीं पाहावी प्रचीति ॥१॥
तुम्हा संकटाचे वेळे ।
काय झांकितों मी डोळे ॥२॥
सेवकाचा साभिमान ।
समर्थाचें हें लक्षण ॥३॥
देव म्हणे दास जनीं ।
चिंता न धरावी मनीं ॥४॥
॥६॥
रे मी भक्तांचा कोवसा ।
मनीं धरावा भरंवसा ॥१॥
समर्थाचीये सेवका ।
काय करवेल रंका ॥२॥
कोप येतांचि ते घडीं ।
घेईन काळाची नरडी ॥३॥
दास सांभा-ळावे सदा ।
मज आणिक नाहीं धंदा ॥४॥
॥७॥
काय गावा रे गांव ।
आम्हां नाहीं सर्व ठाव ॥१॥
बोधमृदंग फूटका ।
ताळ द्वैताचा तूटका ॥२॥
दास वेडे हो बागडे ।
नृत्य करिती देवापुढें ॥३॥
रामभेटींचा समय ।
रामदासीम सांगता नये ॥४॥

॥ अभंगसंख्या ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 31, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP