पंचक - ज्ञानपंचक

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥१॥
आम्ही समाधान गावें ।
तुम्हीं सावध ऐकावें ॥१॥
सकळ सृष्टीचा गोसावी ।
त्याची ओळख पुसावी ॥२॥
स्वयें बोलिला सर्वेशु ।
ज्ञानेविण अवघे पशु ॥३॥
दास म्हणे नाहीं ज्ञान ।
तया नरकों पतन ॥४॥
॥२॥
ज्ञानेंवीण जी जी कला ।
ती ती जाणावी अवकळा ॥१॥
ऐसें भगवंत बोलिला ।
चित्त द्यावे त्याचे बोला ॥२॥
एक ज्ञानचि सार्थक ।
सर्व कर्म निरर्थक ॥३॥
दास म्हणे ज्ञानेंविण ।
प्राणी  जन्मला पाषाण ॥४॥
॥३॥
जेणें ज्ञान हें नेणवे ।
पशु तयासि म्हणावें ॥१॥
जेणें केलें चराचर ।
कोण विश्वासि आधार ॥२॥
ब्रह्मादिकांचा निर्भिता ।
कोण आहे त्यापरता ॥३॥
अनंत ब्रह्मांडाच्या माळा ।
विचित्र भगवंताची कळा ॥४॥
रामदासाचा विवेक ।
सर्वाघटीं देव एक ॥५॥

॥ अभंगसंख्या ॥१३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 30, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP