श्री कल्याण - शुक आख्यान

ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.


महा घोर आरण्य तारुण्यकाळीं । शुकें साहिलें पाहिलें पर्वकाळीं ।
जना गम्य तें रम्य नाना प्रकारीं । वनीं तो मुनी राहिला निर्विकारी ॥१॥
करी स्नानसंध्या विधीयुक्त नेमीं । सदा सर्वदा आवडी नित्य नेमीं ।
क्षुधा रक्षणें भक्षणें मूळकंदें । मुनीराज तो जाणिजेतो मुकुंदें ॥२॥
पहा वेद३ तो वर्णितो ज्या शुकासी । इती ते किती तूकती ना तुकासी ।
पुरश्चर्ण आच्यर्ण सामर्थ्य सिंधू । ऋषीमाजि तो अग्रपूजे विबूधू ॥३॥
शचीचा पती वीपतीलगि धाके । वदे इंद्र रंभेसि ते ते राख राखे ।
दिसे स्पष्ट आरिष्ट माझ्या सुखासी । त्वरें सत्वरा बांध पाशीं शुकासी५ ॥४॥
क्षीराब्धीसुता बोलिली राजयासी । क्षणामाजि जिंकोनि येतें तयासी ।
रतीचा पती संपती यौवनेंसी । ब्रिदें घातलीं पातलीं त्या वनासी ॥५॥
ठकू ठामके ठाण मांडी ठकारी । महा रम्य लावण्य नाना  विकारी ।
बरा सार वीचार केला मनासी । म्हणे शूक हे आमुचा धर्म नाशी ॥६॥
वसंती भल्या फूलल्या पुष्पजाती । वनीं सूमनी भृंग भोगार्थ जाती ।
तथा तारुणी यौवनी संग भोगी । जगीम धन्य रे धन्य तो राजयोगी ॥७॥
भतें पिंड ब्रह्मांड वाक्यार्थ पाहे । तदाकार आकार मूळीं न साहे ।
गुरूभक्त नीवेदनीं संग त्यागी । जगीं धन्य रे तो मुख्य योगी ॥८॥
कुची वर्तुळा रत्नमाळा१ उमाळा । फुलें हार हे मे ल चमेलमाळा ।
सुरत भोग संभोग नेणोनि ज्याला । वृक्षा पुष्ट तो जन्मला जीत मेला ॥९॥
अशौची क्रिमी जंतु शंका दुर्गंधी। म्हणोनी जनीं लिंपिताती सुगंधी।
महा नर्क तो मूर्ख भोगी भगाला । वृक्षा पुष्ट तो जन्मला जीत मेला ॥१०॥
महा सुंदरी ऊदरीम शस्त्र घाली । विदारी दरी मूळ विद्या निघाली ।
जवादी चुवा गंध सूगंधनाभा । गमे ते रमेतुल्य चातुर्यरभा ॥११॥
कुशी द्वादसी वर्षवासी कुवासी । म्हणे शूक मी कष्टलों गर्भवासीं ।
तुझ्या ऊदरीं  जन्मतो पुण्यरासी । तरी पावतो सूखसंतोषराशी ॥१२॥
दधीजा म्हणे कोण आश्चर्य मोठें । चमत्कारिली चाविलीं युग्मबोटें ।
पुढें पाहतां चंद्रजोती विझाली । तयाचे परी दृश्य अदृश्य जाली ॥१३॥
चळे मेरुमांदार जीच्या प्रतापें । चळे चंद्र तारा ज्वरें सूर्प कांपे५ ।
चळे सागरू आगरू लोणखाणी । चळेना शुकेंद्रू महा योग ठाणीं ॥१४॥
रिपू षष्ट जिंकी असा कोण साधू । जनीं शब्द वाचाळ बोध प्रबोधू ।
वृक्षा भांडती निंदिती येकमेकां । भरा दुर्भरा कारणें शिष्यशाखा ॥१५॥
सहस्रामर्ध्ये वीरुळा येक संतू । गिता तत्त्वता वाक्य बोले सतंतू ।
पहा गुप्त चिंतामणी हेमखाणी । आव्हांवेल कल्पतरूची सिरानी ॥१६॥
नसे कामधेनू खडाणे उदंडें । महीमंडळीं माजलीं थोर बंडें ।
असो बोलतां बोलतां शीण होतो । प्रभू रामचंद्राविणें काळ जातो ॥१७॥
गुरूची दया ऊदया सीघ्र पावे । तरी अंतरीं विभ्रमानंद फावे ।
नसे वैर निर्वैरता आत्मदृष्टी । जगीं धन्य तो धन्य कल्याण सृष्टी ॥१८॥
इति श्री शुकआख्याननिरुपणं समाप्तमस्तु ॥


Last Updated : March 22, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP