मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कुराण|
अल्‌मुतफ्फिफीन

सूरह - अल्‌मुतफ्फिफीन

कुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि सुख-समृद्धीचे नंदनवन बनवू शकतो.


(मक्काकालीन, वचने ३६)

अल्लाहच्या नावाने, जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे.

विनाश आहे दांडी मारणार्‍यांसाठी, ज्याची स्थिती अशी आहे की जेव्हा लोकांकडून घेतात तेव्हा पुरेपूर घेतात आणि जेव्हा त्याला मापून किंवा तोलून देतात तेव्हा त्यांना कमी देतात. काय या लोकांना समजत नाही की एका मोठया दिवशी हे उठवून आणले जाणार आहेत? त्या दिवशी जेव्हा सर्व लोक जगांच्या पालनकर्त्यासमोर उभे असतील. (१-६)

कदापि नाही. निश्चितच दुराचार्‍यांच्या कर्मांची नोंद तुरुंगाच्या दप्तरात आहे आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ते तुरुंगाचे दप्तर? ते एक पुस्तक आहे लिहिलेले.
विनाश आहे त्या दिवशी खोटे ठरविणार्‍यांसाठी जे बदल्याच्या दिवसाला खोटे ठवितात आणि त्याला तो खोटा ठरवितो जो मर्यादेचे उल्लंघन करणारा दुराचारी आहे. त्याला जेव्हा आमची वचने ऐकविली जातात तेव्हा म्हणतो. या तर पूर्वकालीन कथा आहेत. कदापि नाही, किंबहुना वस्तुत: या लोकांच्या ह्रदयांवर यांच्या वाईट कृत्यांचा गंज चढलेला आहे. कादापि नाही, खचितच त्या दिवशी हे आपल्या पालनकर्त्याच्या दर्शनाला पारखे ठरलेले असतील. मग हे नरकामध्ये जाऊन पडतील, मग त्यांना सांगितले जाईल ही तीच गोष्ट आहे जिला तुम्ही खोटे ठरवीत होता. (७-१७)

कदापि नाही नि:संदेह सदाचारी माणसाची कर्मनोंद उच्च दर्जाच्या लोकांच्या दप्तरात आहे आणि तुम्हाला काय माहीत की काय आहे ते उच्च दर्जाच्या लोकांचे दप्तर? एक लिहिलेले पुस्तक,  ज्याची देखरेख जवळीक असलेले दूत करतात. नि:संदेह सदाचारी लोक मोठया मजेत असतील. उच्च आसनांवर बसून पहात असतील. त्यांच्या चेहर्‍यावर तुम्हाला आनंदाचे तेज जाणवेल. त्यांना शुद्ध व उत्तम मोहोरबंद पेय पाजले जाईल ज्यावर कस्तुरीची मोहर लागली असेल. जे लोक दुसर्‍यावर मात करू इच्छितात त्यांनी  ही वस्तू प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. त्या पेयात तसनीम चे मिश्रण असेल. हा एक झरा आहे ज्याच्या पाण्य़ाबरोबर जवळचे लोक पेय प्राशन करतील. (१८-२८)

अपराधी लोक जगात श्रद्धावंतांची टिंगल उडवीत असत. जेव्हा त्यांच्या जवळून जात असत तेव्हा तिरक्या नजरेने त्यांच्याकडे इशारे करीत असत. आपल्या घरांकडे परततात तेव्हा मजा करीत परतत असत. आणि जेव्हा त्यांना पहात असत तेव्हा म्हणत असत की हे बहकलेले लोक आहेत. वस्तुत: ते त्यांच्यावर निरीक्षक म्हणून पाठविले गेले नव्हते. आज श्रद्धा ठेवणारे अश्रद्धावंतांवर हसत आहेत आसनांवर बसून त्यांची दशा पहात आहेत. मिळाला ना अश्रद्धावंतांना त्या कृत्यांचा बदला जी ते करीत होते? (२९-३६)

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP