राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे - कलम ५१ क

भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत .

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली .


मूलभूत कर्तव्ये .

५१ क . ( क ) संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था , राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ;

( ख ) ज्यांमुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करुन त्यांचे अनुसरण करणे ;

( ग ) भारताची सार्वभौमता , एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण करणे ;

( घ ) देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे ;

( ड ) धार्मिक , भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे ; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे ;

( च ) आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे ;

( छ ) वने , सरोवरे , नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करुन त्यात सुधारणा करणे , आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुद्धी बाळगणे ;

( ज ) विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन , मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे ;

( झ ) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ;

( ञ ) राष्ट्र सतत , उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे .

[ ( ट ) माता - पित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षांदरम्यानचे आपले अपत्य किंवा , यथास्थिति , पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे . ]

ही प्रत्येक भारतीय नागरिकाची कर्तव्ये असतील . ]

N/A

References : N/A
Last Updated : December 19, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP