मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय १० वा

पांडवप्रताप - अध्याय १० वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
समस्तांसी म्हणे द्रोण ॥ विद्या जाहली तुम्हांसी पूर्ण ॥ तरी गुरु दक्षिणा प्रीती करून ॥ आतां दिधली पाहिजे ॥१॥
समरांगणीं जिंकूनी ॥ द्रुपद आणावा बांधूनी ॥ माझे हस्तीं ओपा इतु केनी ॥ आचार्य दक्षिणा पावली ॥२॥
अवश्य म्हणोनि ते अवसरीं ॥ ठोकिल्या संग्राम संकेत भेरी ॥ कौरव पांडव थोर गजरीं ॥ निज भारेंशीं चालिले ॥३॥
प्रलयीं जैसा फुटे सागर ॥ तैसे चालिले चतुरंगदल भार ॥ महा वाद्यांचा गजर ॥ तेणें अंबर कोंदलें ॥४॥
पुढें धांवले नृप हेर ॥ हड बडिलें पांचाल पुर ॥ राजा प्रधान आणि कुमार ॥ नगरा बाहेर धांवले ॥५॥
अभिमान मनीं धरून ॥ कौरव पुढें जाती धांवोन ॥ द्रोणासी म्हणे अर्जुन ॥ कौतुक पाहूं क्षण एक ॥६॥
पांचालाचें दल धुरं धर ॥ फुटला जैसा प्रलय समुद्र ॥ युद्ध मांडलें दुर्धर ॥ परस्परें झगटती ॥७॥
गजांशीं गज भिडती ॥ स्वारांशी स्वार हाणिती ॥ रथियांशीं रथी झगटती ॥ एक वटती पाय दळें ॥८॥
कौरवांची सबल पृतना ॥ तृण वत वाटे पांचाल नंदनां ॥ बाणांचा पर्जन्य जाणा ॥ दोन्ही दलें वर्षती ॥९॥
अनिवार द्रुपदाचा मार ॥ कौरव सेना केली जर्जर ॥ सांडूं पाहती समर धीर ॥ कर्ण सुयो धन तेधवां ॥१०॥
कौरवांसी म्हणे द्रुपद राज ॥ द्रोणा समान मानूनि मज ॥ शस्त्रें ठेवूनि सतेज ॥ दंडवत घालणें ॥११॥
माझा गुरु बंधु द्रोण ॥ त्याचे शिष्य तुम्ही संपूर्ण ॥ विद्या असेल अपूर्ण ॥ ती शिकवीन मी येथें आतां ॥१२॥
अलातचक्र फिरत ॥ तैसें द्रुपदाचें चाप झळकत ॥ बाण सोडिले संख्य्रे रहित ॥ सुटला कंप कौरवांतें ॥१३॥
अनिवार द्रुपदाचा मार ॥ पळां लागले धृत राष्ट्र कुमार ॥ पाठीं धांवती द्रुपददल भार ॥ सेना समग्र लुटियेली ॥१४॥
नगरवासी लोक बहुत ॥ पाठीं धांवती घ्या घ्या म्हणत ॥ अष्टदिशांनीं धाकें पळत ॥ कौरव सेना त्वरेनें ॥१५॥
कर्ण विकर्ण दुर्यो धन ॥ दुःशासन शकुनि आदिकरून ॥ वेगें पळती उठोन ॥ सकल राजयां सहित पैं ॥१६॥
टाळी पिटूनि पांचाल हांसत ॥ आडमार्गें पळती अंध सुत ॥ म्हणे अभय देऊनि समस्त ॥ नीट वाटे लावा कीं ॥१७॥
धांपें दाटले कौरव ॥ म्हणती भीमार्जुना धांव ॥ सेना परा भविली सर्व ॥ निर्वाण काय पाहातसां ॥१८॥
ऐसें ऐकतां भीमार्जुन ॥ द्रोण चरणीं करूनि नमन ॥ रथा रूढ होऊन ॥ मनो वेगें धांवती ॥१९॥
रथाखालीं उतरोन ॥ भीम धांवे गदा घेऊन ॥ वीज वृक्षीं पडे कडकडोन ॥ तेवीं परचमूंत मिसळला ॥२०॥
कुंजरांच्या थाटी बहुत ॥ गदाघायें निवटीत ॥ मस्तकींचीं मुक्तें विखुरत ॥ वाटे नक्षत्र वृष्टि होतसे ॥२१॥
मुसल घायें होय चूर्ण ॥ तेवीं कुंभस्थलें जाती फुटोन ॥ संहारिले गज संपूर्ण ॥ म्हणती प्रलय मांडला ॥२२॥
अश्वरथियांवरी पार्थ ॥ धांवला प्रलयशर सोडीत ॥ नागरिक दीन जाहलीं समस्त ॥ दांतीं धरिती तृण तेव्हां ॥२३॥
त्यांसी न मारिती भीमार्जुन ॥ म्हणती नगरांत जा पळोन ॥ इकदे पुरंदर नंदन ॥ आर्त पुरवी गुरूचें ॥२४॥
लक्षूनि द्रुपदाचा रथ ॥ चालिला दलासी संहारीत ॥ रक्तनद्या धांवती बहुत ॥ वाट पुसती सिंधूची ॥२५॥
मुकुटां सहित शिरें उडवीत ॥ शस्त्रां सहित छेदिले हस्त ॥ शिरकमलांच्या लाखोल्या बहुत ॥ भूलिंगास समर्पिल्या ॥२६॥
रक्तगंगा संगें करू नियां ॥ प्रेतें जाती सिंहूमी भेटा वया ॥ उरले ते पाठी देऊ नियां ॥ पळती तेव्हां दश दिशा ॥२७॥
द्रुपदें सोडिले सहस्त्र बाण ॥ ते पार्थ वीरें पाहोन ॥ लक्ष बाणें करून ॥ पांचालराव खिळियेला ॥२८॥
इतुक्यांत धांवला सत्यजित ॥ तेणें युद्ध केलें अपरिमित ॥ पार्थाचें युद्ध अद्भुत ॥ दुरूनि पाहात भीम तेव्हां ॥२९॥
अश्वांसह सत्यजिताचा रथ ॥ बाणें चूर्ण केला क्षणांत ॥ हांक फोडो नियां त्वरिता ॥ सत्य जित पळाला ॥३०॥
पुढें पांचाल सोडी बाण ॥ ते कदा न लेखी अर्जुन ॥ जैसें मतवा दियाचें भाषण ॥ वेदान्तज्ञानी मानीना ॥३१॥
गांडीवघन मंडल अद्भुत ॥ बाणधारा वर्षे पार्थजीमूत ॥ पांचाल तेव्हां मनीं भावीत ॥ आला मृत्यु यावरी ॥३२॥
ध्वज छत्र चाप बाण तूणीर ॥ तत्काल छेदूनि केले चूर ॥ अश्व सारथी सत्वर ॥ प्रेतें करून पाडिले ॥३३॥
समुद्रांत देऊनि बुडी ॥ विनायक जैसा मत्स्य काढी ॥ तेवीं पार्थ खालीं ॥ उतरूनि प्रौढी ॥ स्वबाहीं कवळी द्रुपदातें ॥३४॥
बळें उचलोनि तत्काळ ॥ स्यंदनावरी घातला पांचाल ॥ तेव्हां कौरव बंधु सकल ॥ जय जय कारें गर्जती ॥३५॥
चौफेरीं फुटे तडागजल ॥ तैसें पळालें पांचाल दल ॥ ग्राम लुटा वया तत्काल ॥ कौरववीर धांवती ॥३६॥
अर्जुनें धांवडिले दूत ॥ प्रजा पीडणें हें अनुचित ॥ द्रोणाचा गुरु बंधु ॥ पांचालनाथ ॥ वंद्य होय आम्हांतें ॥३७॥
जिंकलिया द्रुपदवीर ॥ द्रोणाचें हें राज्य समग्र ॥ अभिलाषितां सत्वर ॥ दोष सागरीं बुडाल पैं ॥३८॥
दूत मुखें आज्ञा ऐकून ॥ फिरले समस्त कौरव जन ॥ पार्थें दूत्त पाठवून ॥ प्रधान आणिले द्रुपदाचे ॥३९॥
तेही द्रोणापाशीं येऊन ॥ उभे ठाकले कर जोडून ॥ द्रुपद पुत्र आणून ॥ गुरु पुढें उभा केला ॥४०॥
पार्थ म्हणे द्रोणासी ॥ भेटावें आतां गुरु बंधूसी ॥ मग हास्य मुखें द्रुप दासी ॥ भारद्वाज बोलतसे ॥४१॥
तुं राजा मी बाह्मण दीन ॥ मित्रत्व नव्हेचि समान ॥ बोललासी जें मागें वचन ॥ मनामाजी आठवीं ॥४२॥
अधोव दनें द्रुपद बोले ॥ अज्ञाना पासूनि अंतर पडलें ॥ सज्ञानें क्षमा करावें वहिलें ॥ थोरपण तरीच तें ॥४३॥
ऐसें बोलतां पृषद नंदन ॥ कृपेनें आलिंगी गुरु द्रोण ॥ म्हणे मनांत भय न धरीं पूर्ण ॥ आनंद घन असावें ॥४४॥
आम्ही तुम्ही बाल मित्र विशेष ॥ असों अग्निवे शाचे शिष्य ॥ केला असे विद्याभ्यास ॥ तो आठव मज आहे ॥४५॥
म्यां केला पुरुषार्थ ॥ राज्य घेतलें तुझें समस्त ॥ दक्षिणेसी मज देत पार्थ ॥ तुज सहित साधू नियां ॥४६॥
त्यांत अर्धवि भाग राज्य पूर्ण ॥ मी देतों तुज संतोषें करून ॥ वैर भाव टाकून ॥ तें त्वां भोगून असावें ॥४७॥
ऐसें बोलो नियां द्रोणें ॥ स्वस्थलीं धाडिलें बहु मानें ॥ परी तो अपमान कृशानें ॥ संता पूनि दग्ध जाहला ॥४८॥
मनांत म्हणे नृपवर ॥ प्रसन्न करूनि अपर्णावर ॥ अयोनि जन्म मागेन कुमार ॥ द्रोणालागीं मारी ऐसा ॥४९॥
असो इकडे कौरव पांडव ॥ हस्तिना पुरा आले सर्व ॥ धार्व राष्ट्र पांडवांशीं द्वेषभाव ॥ दिवसें दिवस वाढविती ॥५०॥
लोटलिया एक वर्ष ॥ बल बुद्धि विवेक विशेष ॥ भीष्प्रें जाणूनि धर्मास ॥ युवराज्य दीधलें ॥५१॥
सुह्रद सेवक प्रजा सकळिक ॥ सुखी केले धर्में अधिक ॥ जे ते धर्मासी स्तविती लोक ॥ राज्य योग्य होय हा ॥५२॥
विद्यानिपुण भीम सेन ॥ तरी गुरु करूनि रेवतीरमण ॥ गदा युद्धीं कुशल पूर्ण ॥ कृष्णा ग्रजें तो केला ॥५३॥
हें देखोनि ॥ अच्युता ग्रजा पाशीं जाऊन ॥ भीमाचे ईर्षेनें पूर्ण ॥ गदा युद्ध शिकला पैं ॥५४॥
राज धर्मीं संपूर्ण ॥ युधिष्ठिर जाहला निपुण ॥ गदा युद्धीं भीम सेन ॥ निवडला अर्जुन शस्त्रास्त्रीं ॥५५॥
नीतिज्ञानी पूर्ण कुशल ॥ परम विवेकी जाहला नकुल ॥ रणपंडित धर्मशील ॥ सेवेसी सादर धर्माचे ॥५६॥
भूत भविष्य वर्तमान ॥ क्षात्र धर्मीं सहदवे निपुण ॥ पांचही विद्या गुण बलें पूर्ण ॥ जन म्हणते जाहले ॥५७॥
एकान्तीं पार्थासी म्हणे द्रोण ॥ म्यां तुज विद्या दिधली संपूर्ण ॥ अगस्त्य महा मुनीचा शिष्य जाण ॥ माझा गुरु अग्निवेश ॥५८॥
तेणें अस्त्र सांगितलें पूर्ण ॥ तें जैसें तेजाळ विष्णु सुदर्शन ॥ सोडितां ब्राह्मांड संपूर्ण ॥ निमेषार्धें जाळील पैं ॥५९॥
तें कोणासी न सांगावें ॥ भलतियावरी न घालावें ॥ मग तें ब्रह्मास्त्र बरवें ॥ अर्जुनासी उपदे शिलें ॥६०॥
अर्जुन घाली लोटां गण ॥ म्हणे एवढें द्यावें मजला गून ॥ सकल रायां देखतां दारुण ॥ मजसीं युद्ध करावें ॥६१॥
तथास्तु म्हणे गुरु द्रोण ॥ यावरी भीम नकुल सहदेव घेऊन ॥ पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ॥ दिग्विजय केला अर्जुनें ॥६२॥
समस्त जिंकूनि नृपवर ॥ द्रव्यें भरिलें हस्ति नापुर ॥ हें परिसोनि धृत राष्ट्र ॥ चिंतार्णवीं पडियेला ॥६३॥
म्हणे पांडव जाहले बलवंत ॥ राज्य घेतील क्षणांत ॥ अभागी माझे सुत ॥ भिक्षा मागतील वाटतें ॥६४॥
मग कणिक नामा प्रधान ॥ अंधें आणिला बोलावून ॥ धृत राष्ट्राचा सखा निर्वाण ॥ दीर्घद्र्ष्ट नष्ट तो ॥६५॥
अंध एकान्तीं त्यासी सांगत ॥ पांडव जाहले बलवंत ॥ माझ्या पुत्रांचे मनोरथ ॥ पुढें निष्फल दिसताती ॥६६॥
तो सकल कुटिलां माजी श्रेष्ठ ॥ खलदुर्जनांत वरिष्ठ ॥ कुबुद्धि सागर पापिष्ठ ॥ कापट यवेषी धूर्त तो ॥६७॥
म्हणे राया ऐकें साव धान ॥ पुढें आहे बहुतां दिवशीं मरण ॥ तरी त्याचा विचार जाण ॥ अवश्य आतांचि करावा ॥६८॥
वैरी पादोदर कृशान ॥ सर्वथा म्हणूं नये लहान ॥ त्यांचें निर्मूल करावें पूर्ण ॥ सकळ कार्य टाकोनियां ॥६९॥
गोत्रय सर्पातुल्य भूपती ॥ न कळे कोणे काळीं डंखिती ॥ सर्प क्वचित द्दष्टी पडती ॥ गोत्रज पीडिती पदोपदीं ॥७०॥
कृत्रिम मैत्री करून ॥ घ्यावा वैरियाचा प्राण ॥ आपुलें गुह्य न सांगोन ॥ वर्म लक्षावें शत्रूचें ॥७१॥
घ्यावें बहुतांचें मनोगत ॥ आपुलें न सांगावें ह्रद्नत ॥ कुंडाग्नि अपुलें आराध्यदैवत ॥ परी तो जाळील क्षणार्धें ॥७२॥
सूर्य नारायण दैवत पाहीं ॥ परी मंडळ कोणा न धरवे ह्रदयीं ॥ गुरु सुजाण सर्वही ॥ त्या सही नियमितचि भजावें ॥७३॥
स्वर्गींहूनि आले पितृगण ॥ तरी त्यां सही शमीपत्र प्रमाण ॥ पिंड दर्भ देऊन ॥ बोळवावे थोडक्यांत ॥७४॥
माता पिता आणि बंधू ॥ आगळे वाढतां करावा वधू ॥ धूर्व कुटिल कपट सिंधू ॥ राज गृहीं असावे ॥७५॥
क्षेत्रालागीं कंटकावरण ॥ पायासी रक्षक उपानह जाण ॥ आप्तसुह्रदांचे घ्यावय प्राण ॥ विष जवळी असावें ॥७६॥
तस्कार धरावया श्वान ॥ मत्स्य आकळा वया जाळें जाण ॥ शोधा वया शत्रूचें न्यून ॥ खल कपटी असावे ॥७७॥
स्तंभ ओढितां पडे मंदिर ॥ मूळीं तोडितां पडे तरुवर ॥ शत्रूचें न्य़ूचें न्यून अहोरात्र ॥ लक्षितां क्षय सहजचि ॥७८॥
भुजंगाचे दंत पाडून ॥ आधींच गारुडी करिती दीन ॥ किंवा उन्मत्त गज जाण ॥ अंकुशें क्षीण करिती पैं ॥७९॥
आधीं मुखीं ताडावा भुजंग ॥ मग चूर्ण करावें मागील अंग ॥ वृश्चिकाचें पुच्छ सवेग ॥ छेदूनि क्षीण करावें ॥८०॥
साम दान भेद दंड करून ॥ घ्यावा सूत्रूंचा प्राण ॥ आप्तता हे टाकून ॥ व्हावें कठिण कालवत ॥८१॥
राजा म्हणे कणिका सुमती ॥ त्वां कथिल्या त्या मानाल्या युक्ती ॥ परी प्रस्तुत कैसा रीती ॥ करावी तें सांग पां ॥८२॥
पोटासी आला जो रोग ॥ तो काय मानावा पुत्र सांग ॥ छेदूनि काढावा सवेग ॥ तत्काल प्राणहर्ता तो ॥८३॥
कणिक म्हणे युक्ति हेचि प्रमाण ॥ बाहेर दावूनि भलेपण ॥ घ्यावे शत्रूंचे प्राण ॥ विचार अन्य असेना ॥८४॥
बाह्य नम्रता धरूनि बहुत ॥ अंतरीं त्यांचा करावा घात \। बलिष्ठ देखोनि अत्यंत ॥ लीनता तेथें धरावी ॥८५॥
द्र्व्यलुब्धासी देऊनि धन ॥ वश करावें न लागतां क्षण ॥ जो असेल आपणा समान ॥ त्याशीं स्पर्धा करावी ॥८६॥
शत्रु दुर्बल होऊन ॥ जरी आला आपणा शरण ॥ त्याचें न करितां पालन ॥ घ्यावा प्राण न कळतां ॥८७॥
जरी नाटोपती जागेपणीं ॥ तरी निज लिया लावावा अग्नी ॥ किंवा फलतांबूल भोजनीं ॥ विषप्रयोग करावा ॥८८॥
हारी आणावी द्यूत खेळोनी भाकें गोवावें सत्यवचनीं ॥ एवं पांडव नाहींत अवनीं ॥ ऐसें करूनि टाकावें ॥८९॥
पांडव असतां जीवंत ॥ न वांचती तुझे सुत ॥ हाचि जाण मुख्यार्थ ॥ फार काय बोलूं मी ॥९०॥
इकडे पांडवांची वर्तणूक ॥ देखोनि स्वस्थ प्रजा लोक ॥ म्हणती उदया आला आमुचा भाग्यार्क ॥ धर्म राजा होईल कीं ॥९१॥
सकलां माजी विद्या अद्भुत ॥ पार्थाचे ठायीं पूर्ण बिंबत ॥ बलाधिक भीम होत ॥ नकुल सहदेव तैसेचि ॥९२॥
विवेकीं परम निपुण ॥ धर्मराज धर्मपरायण ॥ ऐसें देखोनि प्रजा संपूर्ण ॥ म्हणती धर्मासी राज्य द्यावें ॥९३॥
ऐसी हेर मुखें वार्ता समस्त ॥ दुर्यो धन श्रवण करीत ॥ मनीं होऊनि संतप्त ॥ पितया जवळी पातला ॥९४॥
म्हणे प्रजा होऊनि एक चित्त ॥ राज्य धर्मासी देऊं पाहात ॥ तुज चक्षुहीन म्हणती ॥ समस्त ॥ राज्याधिकार नाहीं तूतें ॥९५॥
द्रोणाचार्य गंगा सुत ॥ तेही ॥ त्यांसी मिळाले यथार्थ ॥ मज वधितील समस्त ॥ अति अनर्थ ओढवला ॥९६॥
कोणाच्या वीर्या पासून ॥ पांडव जाहले निर्माण ॥ हे दूर ठेवावे आपणा पासून ॥ तरीच कल्याण कांहीं एक ॥९७॥
अंधें बोला वूनि पांडवां प्रती ॥ म्हणे तुंम्हीं रहावें वारुणावतीं ॥ बैसोनियां दिव्यरथीं ॥ आतांचि शीघ्र जाइंजे ॥९८॥
तेंही राज्य आमुचें ॥ कौतुक पहावें तेथींचें ॥ मनासी रुचेल साचें ॥ तरी तेथेंचि रहावें ॥९९॥
धर्म म्हणे तूं पिता गुरु पुर्ण ॥ तुझी आज्ञा मज प्रमाण ॥ आतांचि जातों म्हणोन ॥ वंदी चरण अंधाचे ॥१००॥
भीष्म द्रोण आणि विदुर ॥ परम नमीत युधिष्ठिर ॥ तों दुर्योंधनें विचार ॥ एकान्तीं द्दढ मांडिला ॥१०१॥
कणिक शकुनि कर्ण ॥ दुःशासनादि खल मिळोन ॥ जैसे वृकाचे सदनीं श्वान ॥ प्रधानत्व करिती पैं ॥१०२॥
यवनज्ञाति पुरोचन ॥ महाखल दुष्ट दारुण ॥ तो म्लेच्छ बोलावून ॥ दुर्योंधनें कंठीं धरियेला ॥१०३॥
म्हणे वारुणावतासी जाऊस ॥ घेऊनि समस्त प्रजा जन ॥ पांडवांसी दीजे बहुत मान ॥ आणि सदन ऐसें निर्मावें ॥१०४॥
लाक्षा राळ कर्पूर ॥ यांचें रचावें मंदिर ॥ वंश तैलकाष्ठें अपार ॥ यांचे थाट बांधावे ॥१०५॥
वंशाचे नळे संपूर्ण ॥ भरीं दीपन द्रव्यें करून ॥ वाख सण सूत्रें जाण ॥ ठायीं ठायीं आळे बांधीं ॥१०६॥
कार्पास वंश पत्रें सणकाडिया ॥ येणें वरील आडें गुंडो नियां ॥ कापूर नवनीत कालवू नियां ॥ भिंती समग्र लिंपिजे ॥१०७॥
त्यावरी मृत्तिकेचा लेप अणुमात्र ॥ देऊनि भिंती घोटीं समग्र ॥ परी चित्रें काढावीं विचित्र ॥ मनोहर चहूंकडे ॥१०८॥
अतसीचूर्ण घालून ॥ भूमि करावी समान ॥ रमणीय निर्मावें सदन ॥ शक्र देखोन भुले ज्यातें ॥१०९॥
भरूनि सकल संपत्ती ॥ मग देईं पांडवां प्रती ॥ बहुत नम्रता धरूनि चित्तीं ॥ शत्रु तेथें होमावे ॥११०॥
आम्ही ज्या वेळीं करूं श्रुत ॥ त्या वेळीं अग्नि लावावा त्वरित ॥ पळ न लागतां समस्त ॥ गृहा सहित भस्म करीं ॥१११॥
कोणासी कळों नेदीं मात ॥ वैरी होमावे अकस्मात ॥ मग तो यवन उठत ॥ अवश्य म्हणोन तेधवां ॥११२॥
रथासी रासभ लावून ॥ पुढें धांवला तो दुर्जन ॥ सेवंचि निघाले पंडुनंदन ॥ करिती रोदन जन सर्व ॥११३॥
वनासी रिघतां रघुवीर ॥ अयोध्या जन रडती समग्र ॥ कीं मथुरेसी जातां याद वेंद्र ॥ गौळी जन चडफडती ॥११४॥
तैसेचि गजपुरींचे जन ॥ शोक करिती दारुण ॥ प्रजा समस्त मिळोन ॥ पाठीं धांवती धर्माचे ॥११५॥
सकल प्रजांचें समाधान ॥ धर्म राज करी आपण ॥ म्हणे मी सत्वर येतों परतोन ॥ मनीं अन्य न धरावें ॥११६॥
बोळवूनि आले कौरव समस्त ॥ विदुर द्रोण गंगा सुत ॥ प्रजेचा प्रेमा देखोनि तुकीत ॥ मान सुयोधन तेधवां ॥११७॥
असो प्रजेचें करूनि समाधान ॥ रथीं बैसती पंडुनंदन ॥ विदुरासी म्हणे दुर्योधन ॥ तुम्ही निरोप मागा आतां ॥११८॥
त्रिकालज्ञानी विदुर भक्त ॥ कापटया जाणूनि मनांत ॥ धर्मासी जाणवूं पाहे मात ॥ परी दुर्जन भोंवतीं ॥११९॥
मग म्लेच्छ भाषा जी बर्बर ॥ त्या शब्द संकेतें बोले विदुर ॥ हूं हूं म्हणोनि युधिष्ठिर ॥ श्रवण करी उगाचि ॥१२०॥
तुज पीडा आली परम कठिण ॥ अहो रात्र सावधान ॥ गृह स्वरूपें केवळ अग्न ॥ चतुरें पूर्ण ओळखिजे ॥१२१॥
वणव्याचें भय देखोनी ॥ विवरांतूनि निघती प्राणी ॥ दिवसा मृगया कीजे वनीं ॥ रात्रीं हरिस्मरणीं जागावें ॥१२२॥
अमित्राचा गोड शब्द ॥ केवळ जाणिजे विषकंद ॥ जैसे गोड बोलोनि मैंद ॥ पाश घालिती न कळतां ॥१२३॥
विषरूप जाणिजे अन्न ॥ गृह स्वरूपें कृशान ॥ कथिलें जें वर्त मान ॥ पंचप्राणांसी विदित असो ॥१२४॥
कुबेर दिशा पाठीसी घालून ॥ सूर्य़ पुत्र दिशा पुढें लक्षून ॥ विजयी होईल वायु नंदन ॥ दुसरेन जाण पुढती पैं ॥१२५॥
ह्रदयीं स्मरतां कंसारी ॥ कदा दुःख न बाधे संसारीं ॥ अपाय ते उपाय निर्धारीं ॥ सर्वेपरी जाणिजे ॥१२६॥
पुढें होईल गुरु दर्शन ॥ विजय श्री वरील पूर्ण ॥ सकल विघ्नें निवटून ॥ भक्त पावती निजपदा ॥१२७॥
विदुर म्हणे गा सुमती ॥ अर्थ धरिला कीं सर्व चित्तीं ॥ धर्म सद्न्द होऊनि प्रीतीं ॥ म्हणे धन्य धन्य सज्ञाना ॥१२८॥
असो समस्तांसी राहवून ॥ वारूणावतीं चालिले पंडुनंदन ॥ मार्गीं माता पुसे धर्मा लागून ॥ विदुरें काय जाण विलें ॥१२९॥
धर्म सांगे मातेच्या कर्णीं ॥ पूर्वीं विष घातलें भीमा लागूनी ॥ आतां वारुणा वतासी नेऊनी ॥ जाळूं पाहती गृहांत ॥१३०॥
असो वारुणा वताज जवळी पांडव ॥ आले ऐकूनि प्रजा सर्व ॥  पुरोचन करी महोत्सव ॥ सामोरा येत धर्मातें ॥१३१॥
द्र्व्य वस्त्रें अलंकार ॥ उपायनें देती जन समग्र ॥ पुरोचनें जीर्णशाला सत्वर ॥ प्रथम वस्तीसी स्थान दिधलें ॥१३२॥
नित्यनैमित्तिक कर्माचरण ॥ नित्य पंक्तीसी ब्राह्मण भोजन ॥ सर्वही पुरवी पुरोचन ॥ जें जें लागे धर्मातें ॥१३३॥
मग कापटय गृह निर्मून ॥ धर्मासी विनवी पुरोचन ॥ तुम्हां लागीं निर्मिलें सदन ॥ तें येऊन अवलो कावें ॥१३४॥
म्यां कष्ट बहुत ॥ तें सार्थक करावें समस्त ॥ अवश्य म्हणोनि त्वरित ॥ पांचही जण ऊठिले ॥१३५॥
उपरमाडिया गोपुर ॥ भिंती स्तंभ चित्र विचित्र ॥ देखतां जन भुलती समग्र ॥ म्हणती धन्य कर्त्याची ॥१३६॥
जैसे विषय द्दष्टीं देखुनी ॥ भुलती संसारिक प्राणी ॥ परी साधु तत्काल विटे मनीं ॥ क्षणिक असत्य म्हणो नियां ॥१३७॥
तैसा गृह स्वरूपें केवळ अग्न ॥ एक धर्म राज जाणे आपण ॥ जैसी बकाची शांति गहन ॥ कीं साधु पण मैंदाचें ॥१३८॥
धर्म म्हणे भीमा अवधारीं ॥ सदनपरीक्षा बरी करीं ॥ उदक शिंपूनि भिंतीवरी ॥ सुवास घेऊनि पाहें पां ॥१३९॥
धन्य धन्य महाराज विदुर ॥ गोष्टी प्रत्यया आल्या समग्र ॥ मग म्हणे वृकोदर ॥ तरी कासया येथें रहावें ॥१४०॥
धर्म म्हणे आम्हांसी पंथ ॥ देईल तेथें द्वारकानाथ ॥ परी पुरोचनाशीं मैत्री बहुत ॥ लावो नियां वर्तावें ॥१४१॥
असो करूनि गृह प्रवेश ॥ केली पुरोच नाशीं मैत्री विशेष ॥ दिवसा जाती मृगयेस ॥ कीर्तनघोष रात्रीम करिती ॥१४२॥
असो इकडे विदुराचे ध्यानीं ॥ प्रकटो नियां चक्रपाणी ॥ म्हणे खनकासी पाठवूनी ॥ विवर कोरवीं सत्वर ॥१४३॥
समाधि विसर्जूनि विदुर ॥ खनक आपुला प्राण मित्र ॥ कृष्णो पासक पवित्र ॥ साधु आणि निर्लोभी ॥१४४॥
त्यासी विदुरें बोधूनी ॥ पाठवूनि दिधलें ते क्षणीं ॥ तो एकान्तीं जाऊनी ॥ धर्मरा यासी भेटला ॥१४५॥
विदुरोक्ति सांगतां पूर्ण ॥ तोषलें धर्माचें मन ॥ म्हणे तूं गुरु आम्हांसी पूर्ण ॥ सन्मार्ग पैं दावणारा ॥१४६॥
मग एकान्ती गृहांत जाऊन ॥ खनकें विवर कोरिलें पूर्ण ॥ वरूणा वता बाहेर सप्तयो जन ॥ द्वार केलें उमटा वया ॥१४७॥
धर्म भीमांसी विवर दावून ॥ द्वारीं लाविला चंड पाषाण ॥ म्हणे बाहेर निघतां साही जण ॥ विवरद्वार बुजवावें ॥१४८॥
कृष्णा पक्षीं चतुर्थी निर्शी निशीं ॥ पुरोचन अग्नि लावील गृहासी ॥ सावध असावें सांगोनि त्वरेशीं ॥ खनक गेला गजपुरा ॥१४९॥
तों जवळी आली चतुर्थीं ॥ जे पुरोचनाची प्राणहर्त्री ॥ बैसवूनि ब्राह्मणांच्या पंक्ती ॥ भोजन दिधलें धर्मराजें ॥१५०॥
पंचपुत्रांशीं निषादी ते दिवसीं ॥ य़ेऊनि राहिली वस्तीसी ॥ कुंतीनें भोजन दिधलें त्यांसी ॥ मग तीं निजलीं तेथेंचि ॥१५१॥
पांडवपंक्ती आधीं बैसून ॥ पुरोचनें सारिलें भोजन ॥ तों द्वादशघटिका रात्र पूर्ण ॥ जाहली जाण ते दिवशीं ॥१५२॥
निद्रेचें मिष घेऊनी ॥ भीम सावध पाहे नयनीं ॥ तों पुरोचन चुडी पाजळोनी ॥ मंदिर द्वारा पातला ॥१५३॥
इतुक्यांत भीम सावध होय ॥ म्हणे पुरोचना करितोसी काय ॥ तंव तो बोले लवलाहें ॥ शीत बहुत वाजतें मज ॥१५४॥
म्हणोनि पाजळिला अग्न ॥ लटिकाचि तापे पुरोचन ॥ मागुती निद्रेचें मिष घेऊन ॥ भीम सेन पाहातसे ॥१५५॥
घटिका एक जाहली पूर्ण ॥ मागुता उठे लावा वया अग्न ॥ तों भीम बैसला उठोन ॥ कां रे कृशान लावितोसी ॥१५६॥
तुज शीत वाजतें बहुत ॥ तरी शेकितों नेऊनि सदनांत ॥ मग तो यवन बांधूनि त्वरित ॥ गृहामाजी टाकिला ॥१५७॥
मग भीम सेनें तत्काळ ॥ गृहासी चहूंकडे लाविला जाळ ॥ बंधु माता घेऊनि सकळ ॥ विवरमार्गें चालिला ॥१५८॥
तैलदीपिका पाजळून ॥ साही जणें चाललीं तेथून ॥ जय जय श्रीरूक्मिणीरमण ॥ वारंवार स्मरताती ॥१५९॥
श्री कृष्ण कृपेंकरून ॥ विवरमार्ग गेलीं क्रमून ॥ भीमसेनें द्वार बुजवून ॥ तत्कालचि टाकिलें ॥१६०॥
तों मागें पेटला प्रलयाग्न ॥ कीं मांडलें लंकादहन ॥ घोर सुसाटें भरलें गगन ॥ नगर जन हडबडिले ॥१६१॥
वंशनळे तडतडां उडती ॥ लक्षा नुलक्ष गगनीं जाती ॥ लाक्षार साचे पूर धांवती ॥ वास येती औषधींचे ॥१६२॥
निषादी पंचसुतां सहित ॥ आणि पुरोचन भस्म झाला गृहांत ॥ लोक हाहाकार करीत ॥ महाशब्दासी मिती नाहीं ॥१६३॥
मस्तक आपटिती नगर जन ॥ एक वक्षः स्थलें घेती बडवून ॥ आठवूनि पांडवांचे गुण ॥ मूर्च्छा येऊन पडताती ॥१६४॥
म्हणती धृत राष्ट्र चांडाल यथार्थ ॥ तेणेंचि अग्नि लाविला त्वरित ॥ तुझाही कुलक्षय समस्त ॥ ऐसाचि होईल दुर्जना ॥१६५॥
इकडे भीम सेन कांस घालून ॥ चौघे बंधू माता जाण ॥ स्कंधीं आपुलें बैसवून ॥ दक्षिण पंथें जातसे ॥१६६॥
वारुणा वता हूनि धांवले दूत ॥ गजपुरीं जाऊनि सांगती मात ॥ ऐकोनि धृत राष्ट्र शोक करीत ॥ कौरव विलपती लटिकेचि ॥१६७॥
दुर्यो धन करी हाहाकार ॥ म्हणे विदुरा कैसा करावा विचार ॥ तंव तो परम चतुर ॥ मनांत हांसत विलपे वरी ॥१६८॥
म्हणे न कळे ईश्वरकळा ॥ पुढें काय देखूं डोळां ॥ चिरंजीव भूमंडळा ॥ वरी कोण जाहलासे ॥१६९॥
ज्याचें कर्म त्यासी बाधक पूर्ण ॥ एका पुढें एका मागें मरण ॥ तुम्ही आम्ही क्षेमकल्याण ॥ वांचों काय दिवस बहु ॥१७०॥
पांडव दग्ध जाहले गृहांत ॥ उरले तेही नाशवंत ॥ असो कौरव स्त्रानें करुनि समस्त ॥ उत्तरक्रिया सारिती ॥१७१॥
वारूणावतीं दूत धाडिले ॥ पांडव जजे स्थलीं निमालें ॥ तेथें वृक्ष लावा वहिले ॥ मठ मंडप निर्मूनि ॥१७२॥
असो इकडे भागीरथीतीर ॥ पांडव पावले समग्र ॥ नमन करी युधिष्ठिर ॥ भागीरथीसी तेधवां ॥१७३॥
पावा वया पैलथडीस ॥ नाहीं नौका आणि मनुष्य ॥ तों कर्णधार त्या समयास ॥ विदुरें सत्वर पाठविला ॥१७४॥
तो नौका घेऊनि कर्णधार ॥ पांडवांपाशीं आला सत्वर ॥ विदुराच्या खूणा समग्र ॥ पूर्वापार सांगतसे ॥१७५॥
मग साही जणें उतरोनी ॥ परतीरा नेलीं तये क्षणीं ॥ धर्में तयासी आलिंगूनी ॥ अश्रु नयनीं आणिले ॥१७६॥
म्हणे तुझा न विसरूं उपकार ॥ संकटीं रक्षी तो सद्नुरु नर ॥ अन्न दाता भयत्राता साचार ॥ तोही गुरु म्हणावा ॥१७७॥
विदुर आणि यदुवीर ॥ खनक आणि तूं कर्णधार ॥ पांचवा पंडुराज निर्धार ॥ पांडव करिती आनंदें ॥१७९॥
स्वर्धुनीचें प्रेमें स्तवन ॥ करिती तेव्हां पांडव जाण ॥ जिचें करितां पयःपान ॥ भवरो गहरण तत्काल ॥१८०॥
जय जन्हु कुमारि अघसंहारके ॥ भागीरथि त्रिविधताप मोचके ॥ कमला भवानी सुखदायके ॥ कीं ज्ञान प्रदे जान्हवि ॥१८१॥
पद्मना भचरणोद्भवे जननि ॥ त्रिपथगामिनि मंदाकिनि ॥ व्योमकेशमस्त कविला सिनि ॥ सित सुमन हारावली ॥१८२॥
जलजा सनप्रिया दोष निवारिणि ॥ काशीतल वाहिनि सगर कुलतारिणि ॥ मणिकुंडल भूषण धारिणि ॥ त्रिदशमुनितोषके ॥१८३॥
जय अलक नंदे जन पावनि ॥ ज्ञान गंगे कनकदुकूल धारिणि ॥ सहस्त्रवदन दुःखहारिणि ॥ शुभकाराके शुभ सलिले ॥१८४॥
जय हिमनग पाषाण भेदिनि ॥ परमपददायके देवव्रत जननि ॥ तव चिंतनीं दर्शनीं स्पर्शनीं ॥ होती प्राणी पावन ॥१८५॥
तव सलिलीं ठेवितां कलेवर ॥ पुनरपि नाहीं संसार शरीर ॥ मातृपयो धर पान साचार ॥ सर्वथाही न करी तो ॥१८६॥
तो जाहला जन्म रहित ॥ शरीर धरी अकस्मात ॥ शंखचक्राद्यायुधें समस्त ॥ तो पहुडे भोगीं द्रावरी ॥१८७॥
उरगरि पूवरी बैसोन ॥ हिंडोनि लोक करी पावन ॥ ऐसें भागीरथीचें स्तवन ॥ पृथानंदन करिते जाहले ॥१८८॥
नित्यनेम सारूनी ॥ भीम स्कंधीं घे वसुदेव भगिनी ॥ नामें रूपें झांकूनी ॥ घोर काननीं प्रवेशती ॥१८९॥
पुढें कथा रसभरित ॥ सुधार साहूनि गोड बहुत ॥ श्री धर मुखें पंढरीनाथ ॥ अति सुरस वदवील ॥१९०॥
बाल काचा धरूनि हात ॥ स्वयेंचि लिही जैसा पंडित ॥ त्याचिपरी श्रीरुक्मिणीकांत ॥ अर्थ सहित सर्व कर्ता ॥१९१॥
तो भीमातीरवासी दिगंबर ॥ श्री धर ह्रत्कल्हार मधुकर ॥ यतिवर्य ब्रह्मानंद उदार ॥ अभंग साचार विनटला ॥१९२॥
सुरस पांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांशी यथार्थ ॥ दशमाध्यायीं कथियेला ॥१९३॥
इति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अदिपर्वटीका श्रीधरकृत ॥ गुरु प्रतिज्ञा जाहली सुफलित ॥ पांडवमोचन लाक्षागृहीं ॥१९४॥
इति श्रीधर कृतादिपर्वणि दशमाध्यायः ॥ श्री कृष्णार्पणमस्तु

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP