जानेवारी २५ - नाम

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.


नामस्मरण हे प्रपंचाकरिता, म्हणजे तो चांगला व्हावा म्हणून नाही, तर प्रपंचाची आसक्ती कमी करण्यासाठी आहे. तरी पण त्याने प्रपंच बिघड्णार नाही. जे होईल ते आपल्या बर्‍याकरिता आहे असे मानून परमात्म्यावर विश्वास ठेवून रहावे. एक गृहस्थ मला भेतले तेव्हा म्हणाले, "मी रिकाम्या वेळात नामस्मरण करतो." त्यावर मी म्हट्ले, "सार्‍या जन्मात महत्त्वाचा आणि सार्थकी लागलेला वेळ असेल तर तो हाच; त्याला तुम्ही रिकामा वेळ कसा म्हणता?" पुढे ते म्हणाले, "प्रारब्धाचे भोग काहि केल्या ट्ळत नाहीत, ते भोगावेच लागतात, असे सर्व संत सांगतात. हे जर खरे, तर प्रारब्धाचे भोग आपण भोगत असताना त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाची काय गरज आहे?" खरोखर हा प्रश्न अगदी बरोबर आहे. आपल्या कर्माचे भोग आपल्याला भोगावे लागतात हे खरे. पण भोग आले की, आपल्या मनाला चैन पडत नाही, तिथे मनाला भगवंताच्या स्मरणात गुंतवून ठेवले की आपले समाधान टिकते. आपल्या सध्याच्या अवस्थेमध्ये, ’भगवंतच्या इच्छेने घडायचे ते घडते’ असे मानणे, किंवा "भगवंत चांगले करील" असा विश्वास ठेवून वागणे, हेच सोपे जाईल. हे दिसायला साधे दिसले तरी यात फार मोठे मर्म साठविले आहे हे ध्यानात धर. "भगवंतच्या इच्छेने घडणार ते घडू द्यावे" असी निष्ठा उत्पन्न व्हायला त्याचे अनुसंधान सतत ठेवले पाहिजे. "आहे त्यात समाधान, आणि भगवंताचे अनुसंधान", एवढीच सद्गुरूची आज्ञा असते. दुसर्याने आपल्याला दुःख दिले असता आपले अनुसंधान चुकते ही त्याची नव्हे, आपली चुक आहे.

"विषय कसा सुटेल? मन एकाग्र कसे होईल?" हे न कळले तरी चालेल. सोडण्याच्या गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा धर्ण्याच्या गोष्टीचा, म्हणजे अनुसंधानाचा, अभ्यास करावा.एक भगवंताचे अनुसंधान ठेवले की सर्व गुण आपोआपच वाढ्तील; ते कसे, तर शरीराचे अवयव सारख्या प्रमाणात वाढ्तात तसे. झाडाच्या मुळांना पाणी घातले की त्याच्या सर्व भागांना पोचते, तसे भगवंताचा विसर पडू न दिला तर सर्व काही बरोबर होते. " अज्ञानाच्या अंधकाराने दुःख भोगत असताना तू माझे स्मरण, माझे अनुसंधान ठेव, म्हणजे तूला पुढे उजेड दिसेल." असे गीतेमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णच अर्जुनाला सुचवीताहेत. दिवा जळायला हवा असेल तर त्यामध्ये सतत तेल घातले पाहिजे, तसे भगवंताचे अनुसंधान सारखे राहण्यासाठी त्याचे नामस्मरण आपण सतत करीत असावे. ज्याचे अनुसंधान अखंड टिकले, त्याचे खाणे, पिणे, उठणे, बसणे, वगैरे क्रिसा भगवंताची सेवाच बनतात.

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP