मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीज्ञानेश्वरांची गाथा|
अभंग ३३८ ते ३३९

पांडुरंग प्रसाद - अभंग ३३८ ते ३३९

श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


३३८

सर्वगत निर्धारितां आत्मा एक

चराचरीं तेथें तंव नाहीं दुजेयाची परी ।

चारी खाणी चारी वाणी चौर्‍यांयशीं

लक्ष योनी मी अपत्य तुमचें अवधारी ॥

तुझिया भेटीलागी रोडेलों दातारा हे

तनु होतसे संकीर्ण भारी ।

जवळीच असतां भेटि कां नेदिसी

थोर सिणविलो वोरबारी रया ॥१॥

तुजविण मी कष्टलों दातारा

कष्टोनि खेदक्षीण जालों ।

संसारश्रम त्रिविधतमें मार्ग

सिध्दचि चुकलों ॥

उपजोनियां बुध्दी येऊं पाहे तुझे

शुध्दी तंव द्वैतसंगें भांबवलों रय ॥ध्रु०॥

मागील कष्ट सांगतां दुर्घट नको

नको ते आठवण ।

सुखदु:खें प्राण पिडला गा बापा

गुणत्रयें ओझें जडपण ।

भव विभव निरय आपदा ऐसें

ऐकिलें आनेआन ।

तूं हे जीव तरी भोगितां हे कवण

हें आकळीतां वाटे विंदान रया ॥२॥

वेळोवेळ भावाभाव बोलतां अवचिता

चोरटा काम उठी ।

तुज देखतां अनादि वाटपाडे वधापरि

धैर्य धांवणे न करिसी गोष्ठी ॥

तुझियें दृष्टी शरीर काळ फाडफाडूं खातो

कवण काकुलती तया ना तुज नुठी

ऐसें विपरीत नवल वाटे ये सृष्टी रया ॥३॥

ऐसें न कळतां भरंवसा मी हिंडे दिशा

हें तंव मन जालेंसें पिसें ।

असोयी जातां अपायी पडिजे श्वास

उश्वास पाळती सरिसे ॥

वय वित्ताचा अंत घेउनि नाडळेपण

परत्र पंथ नकळे भरवसें ।

कर्म वाटे आड गर्वे रिगतां तंव

विघ्नचि उदैलें अपैसें रया ॥४॥

ऐसी माया मोहाची भुलवाणी घालुनि

कीं बापा लाविलें अविचार कामा ।

उपाधि वळसा नथिला धिंवसा

जड केला शुध्द आत्मा ॥

मी तूं कवणाचें विंदान न कळेचि

ऐसी नित निगुति सीमा ।

तर्कबीज कैसें सांपडले वर्म मा

हाचि भावो कल्पिला आम्हा रया ॥५॥

ऐसा वाउगाचि सोसु पुरला गा

बापा परि तूं न पडसी ठाउका ।

साही दर्शनां अठारा पुराणां वेवादु

नाहीं खुंटला ॥

आपुलाला स्वमार्गु संपादिता केउतां

जासी गांवींचा गांवी ।

विश्वास नाहीं चित्ता ये देहीं

ऐसियासी कीजे कायि रया ॥६॥

ऐसा जन्मोनि का उबगलासी मायबापा

कवण कां सांडिली ऐसी ।

रंका काळाचेनि धाकें सत्कर्मे

अनेकें विश्रांति नाहीं या जीवासी ॥

समर्थपणें वेगळें घातलें तरि दैन्य

दारिद्र्य कां भोगवितासी ।

आपुलें म्हणतां न लाजसी देवा

तरि सांगपां माव आहे ते कैसी रया ॥७॥

समुद्रीचें जळ घेऊनि मेघ वरुषती मेदिनी

तें कां मागुतें मिळे सागरीं ।

आकाशा पासाव उत्पत्ति वायु

हिंडे दशदिशीं ।

परि तें ठायींच्या ठायीं राहणें जालें ।

जळींहुनि तरंग अनेक उमटती

परि ते जळींचे जळीं निमाले ॥

स्वप्नसंगें परदेशा गेले तरी

जागृति ठायीं संचले रया ॥८॥

ऐसा तुज पासाव सगुण स्वरुप

जन्मलो गा देवा आतां

कैसोनि वेगळा निवडे ।

लवण पडिलें जळीं कीं कर्पूरासि

नुरे काजळीं तैसे भावार्थ प्रेम चोखडें ॥

ज्ञानदेव म्हणे रुक्मिणीरमणा देई

क्षेम वर्म न बोले फुडें ।

निवृत्तिप्रसादें खुंटला अनुवाद फिटलें

सकळही सांकडें रया ॥९॥

३३९

तो आपुलिया चाडा कोटिगर्भवासां येतां

श्लोघिजे तुझिया गोमटेपणा पकडलो दातारा ।

हें बोलणें बोलतां लाजिजेजी सुंदरा ॥१॥

तुमतें देखिलिया हें मन

मागुतें मोहरेना ।

वज्र द्रवे परि मन न द्रवे

हाचि विस्मो पुढतु पुढती सुंदरा ॥२॥

ऐसें स्थावर जंगम व्यापिलें कीं आपुलें

वालभ केलें तूंत देखिल्या त्रिगुणुपरे ऐसें

कोणे निष्ठुरें घडविलेजी सुंदरा म्हणौनि तुज

माजी विरावें कीं देवा

तूंचि होऊनि राहावें ।

बापरखुमादेविवरा न बोलावे परि

बोले हें स्वभावेंजी सुंदरा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP