श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचें अभंग - ८

श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.


दुर्लभ नर जन्म भाग्योदय वेळ । जिंकुनी कळी काळ व्हावे मुक्त ॥१॥

प्राप्तवेळे जना बुडाले डोहळे । पुन्हा हा न मिळे कांही केल्या ॥२॥

वेष दंभ ज्ञान सकळांसी मान्य म्हणती शरण होऊ तया ॥३॥

त्यागोनि हेंमौढ्य मनें सावधान । करावेम नित्य श्रवण गुरुशास्त्र ॥४॥

करोनि मनन तेंचि आचरावें । सदुरुप्ती व्हावे शरण भावें ॥५॥

करो कांही आज्ञा तैसेची करावें । तेंचि करवावें सकळां कडोनि ॥६॥

वाद भेद वर्म त्यागोनिया अन्य ॥ व्हावे पैं शरण योगी यासी ॥७॥

म्हणे जनार्दन घावो नये होटी । उघडी भ्रमताटी एकनाथ ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP